Site icon MarathiBrain.in

जेष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचे निधन

चंद्रपूर, २४ सप्टेंबर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व चंद्रपूरचे लाडके माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम राजेश्वर पोटदुखे यांचे काल दुपारी वाजता नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

 

८५ वर्षीय शांताराम पोटदुखे यांना सोमवारी हृदयविकाराचा त्रास झाल्याने, नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची वार्ता पोहचताच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी सुधा, मुलगा भरत, मुलगी भारती चवरे व नातवंडे असा आप्त परिवार आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते असले तरी मूलत: राजकारणात राहूनही कोणतीही संस्था, व्यक्ती आणि समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा याकडेपाहण्याचा दृष्टीकोन निरपेक्ष होता. शांताराम पोटदुखे यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याने शांत, संयमी आणि सुस्वभावी नेता गमावला आहे. आज शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणारा आहेत.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला होता. चौथ्यांदा ते खासदार झाले तेव्हा त्यांचा राजकारणातला दांडगा अनुभव बघून त्यांच्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ते. राजकारणात त्यांना कधीही विरोधकांवर आरोप करताना बघितले नाही. सुधीर मुनगंटीवार हे आमदार असताना एकाच मंचावर एकत्र आले असता त्यांनी मुनगंटीवार यांचे जाहीर कौतुक केल्याचेही सर्वश्रुत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते शिक्षण घेत असताना त्या काळात चंद्रपुरात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे नागपूरशिवाय पर्याय नव्हता. मात्र त्यांचे मित्र हुशार असतानाही गरिबीमुळे नागपूरला उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. ही खंत त्यांच्या मनात कायमची घर करून होती. तेव्हापासूनच त्यांनी चंद्रपूरसह ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय करण्याची खूणगाठ बांधली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आजघडीला सहा शाळा व पाच महाविद्यालये आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठ्या हुद्यावर पोहचली आहे. त्यांनी राजकारणात आणलेले समाजकारण आणि आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यात केलेली शैक्षणिक क्रांती कधीही विसरू न शकणारी आहे.

राजकारणात राहूनही साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. असा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जनतेतून निघून गेल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जेष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांच्याबद्दल : 

 

♦♦♦

तुमचे लिखाण, अभिप्राय आणि सूचना आम्हाला पाठवा writeto@marathibrain.com वर. 

Exit mobile version