‘बळीराजा’
तुटलेले हृदय, कोरड्या घशाचं आभाळ,
चहुकडे भयानक दुष्काळ ।
चेहऱ्यावर उमटलेल्या नक्षीदार खुणा
भविष्याच्या पुष्कळ… ( १ )
तो उभा असतो टक लावुन,
नजर त्याची नभांवर ।
चातकासारखा व्याकुळ जीव
बरसेल पाऊस माळरानावर… ( २ )
आयुष्याचा कडवटपणा,
मात्र बुंदीचे लाटु वऱ्हाडीच्या ताटात ।
मुलीचे लग्न केले त्यानी
तीच्या सुखी संसारासाठी थाटात… ( ३ )
तोही तुमच्या- माझ्यासारखाच,
मासाचा गोळा ।
काळ्या आईची सेवा करणारा
बळीराजा साधाभोळा… ( ४ )
बदलेल ही वेदनादायी,
असह्य परिस्थती ।
आस त्याची पक्की मनामधली
भविष्याची प्रगती… ( ५ )
मनातल्या भावनांनी,
डोळ्यातले नभ मात्र दाटले ।
नशिबाचा कोप स्वतःच्या
सुखी संसाराचे पदर मात्र फाटले… ( ६ )
आपला सरजा-राजा , प्रेमळ बायको निरागस,मुलांना पोरकं करून जीवन संपवलं ।
राबराब राबून सावकाराच्या कर्जात
सारं आयुष्य खपवलं… ( ७ )
भिन्न स्वरूप बळीराज्याच्या वेदनांचे,
तुम्ही सुखी पैशावले धनाढ्य राव !
हात जोडुन एवढीच विनंती
“नका मागू पाडून शेतमालाला भाव”… ( ८ )
कवी :- गणेश गंगाधर वरपे
( तालखेड, जि. बीड )
इमेल: 1505ganesh@gmail.com